जून २०२० पासून – गलवानमधील घटनेनंतर भारत आणि चीन या देशांमधील संबंध हे ताणले गेलेले आहेत. लडाख परिसरात चीनच्या आक्रमक पावलामुळे भारतानेही सीमेवर सैन्य तैनात केले असून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणखी वेगाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. चीनच्या सीमेवर विविध ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे वेगाने पुर्ण करण्यावर भारताचा भर आहे. लडाखमधील काही वादग्रस्त भागांबाबत लष्करी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. असं असतांना गेल्या काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांनी ताबा रेषेजवळून उड्डाण केल्याने या तणावात भर पडली आहे. असं असतांना आणखी एक निमित्त दोन्ही देशांमधील तणाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे yuan wang 5 हे जहाज हे मंगळवारपासून श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात उभे आहे. हे जहाज श्रीलंकेच्या दिशेने येत असतांना ते येऊ नये यासाठी भारताने आक्षेप नोंदवला होता. सध्या श्रीलंका आर्थिक संकटातून जात आहे, असं असतांना भारत भरघोस मदत श्रीलंकेला करत आहे. त्यामुळे हे जहाज येऊ नये याबाबत श्रीलंकेने शनिवारी चीनला तसं कळवले देखील. मात्र दोन दिवसांच्या चर्चेनंतर श्रीलंकेने अचानक यु टर्न घेत या जहाजाला काही अटींवर बंदरात येण्याची परवानगी दिली. हंबनटोटा बंदर हे श्रीलंकेतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर असून २०१७ पासून ते चीनच्या एका कंपनीकडे ९९ वर्षाच्या भाडेतत्त्वार हस्तांतरीत करण्यात आलं आहे. त्यामुळे चीनच्या जहाजांना अगदी युद्धनौकांनासुद्धा या बंदरात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हंटलं जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why one ship yuan wang 5 can make the relationships between india and china worst asj
First published on: 16-08-2022 at 15:22 IST