Premium

हरदीपसिंग निज्जर ते अर्शदीप, एनआयएने पंजाबमधील टोळ्यांवर कशी कारवाई केली?

१ जुलै २०२० रोजी भारत सरकारने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या संघटनेविरोधात कठोर कारवाई केली.

Hardeep Singh Nijjar
हरदीपसिंग निज्जर (Interpol website/File)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप केला आहे. भारताने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जस्टिन यांच्या या विधानानंतर आता भारत आणि कॅनडा यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर हरदीपसिंग निज्जर कोण होता? कॅनडात राहून भारतविरोधी करावाया करणाऱ्या, खलिस्तान चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठी पंजाबमधील तरुणांना उद्युक्त करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर भारताने कशी कारवाई केली? अशा संघटना चालवणाऱ्या निज्जर तसेच इतरांवर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खलिस्तान टायगर फोर्स दहशतवादी संघटना म्हणून घोषित

१ जुलै २०२० रोजी भारत सरकारने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या संघटनेविरोधात कठोर कारवाई केली. भारत सरकारने या संघटनेचा हर्षदीपसिंग निज्जर याच्यासह अन्य आठ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले. परदेशात राहून भारतविरोधी कारवाया करणे, परदेशातून पंजाबमधील शीख तरुणांना अतिरेकी गटात सामील होण्यास प्रवृत्त करणे या आरोपांखाली भारताने ही कारवाई केली. यातील निज्जर याचा चालू वर्षातील जून महिन्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारत सरकारने केटीएफ या संघटनेलादेखील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. यूएपीए कायद्याअंतर्गत सरकारने ही कारवाई केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How nia break hardeep singh nijjar and other terriost network who support separate khalistan prd

First published on: 21-09-2023 at 21:18 IST
Next Story
विवाहबाह्य संबंधामुळे चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची हकालपट्टी; वर्तमानपत्राच्या लेखामुळे खळबळ