ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या भागावर भव्य धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेबद्दल आणि लडाखच्या बेकायदा ताब्यात घेतलेल्या भागात दोन काऊंटी निर्माण करण्याच्या चीनच्या योजनेबद्दल भारताने शुक्रवारी संताप व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या बाबी औपचारिकपणे हाती घेतल्या गेल्या आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) डेमचोक आणि डेपसांग येथून दोन्ही देशाचे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारताकडून ही तीव्र प्रतिक्रिया आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठक झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी अनेक यंत्रणा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. लडाखमधील कोणत्या भागात काऊंटी निर्माण करण्याला चीनने मंजुरी दिली? भारत याबाबत चिंतेत का? नेमके प्रकरण काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा