यजमान संघांना वातावरण, खेळपट्टय़ा आणि प्रेक्षकवर्ग यांच्या अनुकूलतेचा नेहमी फायदा होतो. परंतु भारतीय संघ गेले दोन महिने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका आणि तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळत असल्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा होऊ शकेल. कसोटी मालिकेत आपण ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांची अनुभूती घेतली. त्यामुळे चेंडू वळणाऱ्या खेळपट्टय़ा उपलब्ध झाल्यास भारतीय संघ त्याचा चांगला फायदा घेऊ शकतो. परंतु अननुभवी वेगवान माऱ्याची समस्या प्रकर्षांने जाणवत आहे. पण तरीही भारताला विजेतेपदाची संधी आहे, असे मला वाटते. मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपले क्षेत्ररक्षण कमकुवत होते. परंतु गेल्या काही वर्षांत भारताच्या क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे भारतीय संघाचा सकारात्मक दृष्टिकोन मला महत्त्वाचा वाटतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या. विराट कोहली फॉर्मात आहे. एकदिवसीय क्रिकेट जरी वेगळे असले तरी भारतीय संघ त्यात निपुण आहे.
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून चांगले क्रिकेट पाहायला मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटचा कमालीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे चांगले एकदिवसीय सामने पाहायला मिळतील.
(शब्दांकन : प्रशांत केणी)
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2015 रोजी प्रकाशित
अनुभवाचे बोल : अननुभवी वेगवान माऱ्याची समस्या
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात कोण जिंकणार, हे सांगणे अतिशय अवघड आहे. भारत जिंकणार, असे भावनिकपणे म्हणणे योग्य ठरणार नाही.
First published on: 29-01-2015 at 12:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India face shortage of experience fast bowler for world cup