कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि मधल्या फळीत इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं आहे. विजयासाठी मिळालेलं १५७ धावांचं आव्हान मुंबईने ५ गडी राखून पूर्ण केलं. सलग दुसऱ्या विजयानंतर सर्वच स्तरातून मुंबई इंडियन्सवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माचं हे पाचवं तर एकंदरीत सहावं विजेतेपद ठरलं. अनेक आजी-माजी खेळाडूंनीही मुंबईच्या खेळीचं कौतुक केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही मुंबई इंडियन्सचं कौतुक करताना सध्याच्या घडीचा सर्वोत्तम टी-२० संघ म्हणत मुंबईला शाबासकी दिली आहे.

इतकच नव्हे तर सध्या संधी मिळाली तर मुंबई इंडियन्सचा संघ टी-२० विश्वचषकही जिंकू शकतो असंही वॉन म्हणाला.

रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ६८ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला खरा…पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 mi can win t20 world cup says former england captain michael vaughan psd