२४ फेब्रुवारीपासून पुण्यात
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचे बाद फेरीचे सामने ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, अंतिम फेरीचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या यजमानपदाखाली पुण्यात होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने विशाखापट्टणम्, वलसाड, मुंबई आणि बंगळुरू येथे होणार आहेत, तर उपांत्य सामने बडोदा आणि कटक येथे होणार आहेत, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पत्रकाद्वारे दिली आहे.
विशाखापट्टणम्ला विदर्भ-सौराष्ट्र, वलसाडला आसाम-पंजाब, ब्रेबॉर्नवर बंगाल-मध्य प्रदेश आणि बंगळुरूला झारखंड-मुंबई असे उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.
First published on: 31-12-2015 at 05:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji final start at pune from february