Rohit Sharma on Mohammed Shami Australia Return: ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. मात्र, रोहितने काही चिंताजनक माहितीही दिली. रोहित शर्माने सांगितले की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. यानंतर मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला येऊ शकतो की नाही, यावर कर्णधाराने मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुखापतीतून सावरल्यानंतर मोहम्मद शमीने नोव्हेंबरमध्ये बंगालकडून रणजी ट्रॉफी सामने खेळले होते. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध ७ विकेट घेतल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ७ सामने खेळले आहेत आणि २७.३ षटकात ८ बळी घेतले आहेत. या कामगिरीनंतर मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल अशा बातम्या येत आहेत. पण याबाबत अद्याप ऑफिशियल घोषणा झालेली नाही. पण अशी आशा आहे की आणखी कोणतेही अडथळे नसल्यास, तो लवकरतच संघात सामील होईल.

हेही वाचा – IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

मोहम्मद शमीबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळताना त्याच्या गुडघ्याला सूज आली होती, त्यामुळे आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत. या कारणामुळेच त्याच्या कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत अडथळे येत आहेत. आम्हाला खूप सावधगिरी बाळगायची आहे. त्याला अशात ऑस्ट्रेलियात आम्ही आणू शकत नाही.”

हेही वाचा – IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “तो १०० टक्के ठिक आहे की नाही याची खात्री आम्हाला करून घ्यायची आहे कारण बराच काळ लोटला आहे. आम्हाला त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायच नाही आणि इथे येऊन संघासाठी काम करण्यासाठीगी दबाव आणायचा नाही. त्याच्या फिटनेसवर सर्व तज्ज्ञ लक्ष ठेवून आहे, त्यांच्या अनुभवाच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ. प्रत्येक सामन्यादरम्यान ते त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत. खेळानंतर आणि चार षटके टाकल्यानंतर आणि २० षटके उभे राहिल्यानंतर त्याची स्थिती कशी आहे हे पाहिलं जात. पण शमीने कधीही येऊन खेळण्यासाठी दरवाजे कायम उघडे आहेत.

हेही वाचा – WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ

पर्थमधील पहिली कसोटी २९५ धावांनी जिंकल्यानंतर भारताला ॲडलेड कसोटीत १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. गुलाबी चेंडू कसोटीत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. यामुळे संघ WTC क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत भारताला आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी पुढील ३ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma on mohammed shami fitness and comeback in team for last 3 test against australia ind vs aus bdg