ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया पार पडत आहे. या स्पर्धेत भारताने २ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज के. एल. राहुल यांनी निराशजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचेल का? अशी साशंकता निर्माण झाली आहे. यावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारतीय संघाने एक सामना गमावला आहे. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ अंतिम सामना खेळेल, अशी मला आशा आहे. संघाला उपांत्य फेरीत जाऊद्या, मग ते शेवटचे दोन सामने खेळतील,” असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : आता पाकिस्तान जिंकणं अशक्यच पण.. IND vs SA नंतर शोएब अख्तर यांची टीम इंडियावर कटू टीका

दरम्यान, भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. त्यातील एक सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुढील दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. तरच, भारत अंतिम सामन्यात धडक मारू शकतो. बांग्लादेश आणि झिम्बाब्बे बरोबर भारताची लढत होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly makes bold t20 world cup 2022 prediction for rohit sharma and team ssa