विजयासाठीच्या १९३ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची अवस्था ८ बाद ७५ अशी झाली. ४३ धावांची आघाडी मिळालेल्या तामिळनाडूला दुसऱ्या डावात १४९ धावांचीच मजल मारता आली. अक्षय दरेकर आणि चिराग खुराणाने प्रत्येकी ४ बळी टिपले. दिनेश कार्तिक आणि बाबा अपराजित यांनी प्रत्येकी ३५ धावांची खेळी केली.
तामिळनाडूच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी गुम्डघे टेकले. पाच फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. गेल्या सामन्यातील त्रिशतकवीर केदार जाधवला भोपळाही फोडता आला नाही. लक्ष्मीपती बालाजी, औशिक श्रीनिवास, मलोलन रंगराजन आणि यो महेश यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. तामिळनाडूला विजयासाठी दोन विकेट्सची गरज असून महाराष्ट्राला ११८ धावांची आवश्यकता आहे.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamilnadu on victory against maharashtra