भारतीय संघाने २८ वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय मिळवल्यावर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. या वेळी एखाद-दुसऱ्या खेळाडूला यशाचे श्रेय न देता त्यांनी विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले आहे.
‘‘लॉर्ड्सवरील विजय थरारक होता. ही फक्त सुरुवात असून अजून बरीच कामे करायची बाकी आहेत. हा युवा संघ असून त्यांना अजून बरेच काही शिकायचे आहे. गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर संघापुढील आव्हान अजून वाढले आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory of group performance