भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांतील लढतीची पर्वणी पुन्हा चाहत्यांना अनुभवाला मिळणार आहे. हे दोन संघ आज ( १० सप्टेंबर ) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत आमनेसामने येणार आहेत. काही वेळात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ कोलंबोत भिडणार आहेत. तेव्हा, कोलंबोतील हवामान कसं असणार? पाऊस पडणार का? हे सर्व प्रश्न सर्वांना पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. गटफेरीतील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. यानंतर आज पुन्हा दोन्ही संघ भिडणार आहेत.

हेही वाचा : राहुल की किशन? ‘सुपर फोर’ फेरीतील भारत-पाकिस्तान लढत आज; राखीव दिवसाचाही पर्याय

हवामान खात्याने आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी कोलंबोत पाऊस झाला नाही. शनिवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडला.

तर, आज सायंकाळी ५ नंतर AccuWheather नं ८० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण, सध्यातरी सूर्यप्रकाश पडला असून, हवामान स्वच्छ आहे.

हेही वाचा : “मोहम्मद शमीला बाहेर ठेवणारा…”, हरभजनने पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेईंग ११निवडीवरून रोहितवर साधला निशाणा

दरम्यान, आजच्या सामन्यात पाऊस पडला, तर उद्या ( ११ सप्टेंबर, सोमवार ) राखीव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी खेळवला जाईल, असे एसीसीने स्पष्ट केलं आहे. सामना ज्या स्थितीत पावसामुळे थांबेल, तिथूनच पुढे सुरू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather report showers predicted for late evening even as colombo wakes up to bright sunshine india vs pakistan asia cup 2023 ssa