महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, हे वर्ष राज्याला सुख-समृद्धी, भरभराटीचे आणि शांततेचे जावो, असे साकडे विठ्ठल चरणी घातले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते झाली. महापूजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात कालपासून सर्वत्र चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. हे वर्षे जनतेला सुख-समृध्दीचे जावो अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2014 रोजी प्रकाशित
दुष्काळापासून वाचव – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाचरणी साकडे
महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, हे वर्ष राज्याला सुख-समृद्धी, भरभराटीचे आणि शांततेचे जावो, असे साकडे विठ्ठल चरणी घातले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.

First published on: 09-07-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister prithviraj chavan performed mahapuja at vitthal mandir in pandharpur