शक्ती कायदा राज्यातून राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी गेला आहे. ज्यावेळेस मान्यता मिळेल तेव्हा तो अंमलात येईल. त्यात काही त्रुटी आहेत. त्यातूनही मार्ग निघेल. मात्र. लव जिहाद हा विषय राजकीय असल्याने त्यासाठी कायदा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, तिथे काय लायकीचे..”, चित्रा वाघ यांच्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल!

एकीकडे राज्यात लव जिहादच्या विरोधात मोर्चे निघतायत. हा कायदा केला जावा यासाठी आमदार नितेश राणे यासाठी आग्रही असताना दुसरीकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र घटनेमध्ये कोठेही विषय नाही. त्यामुळे या विरोधात कायदा करणे घटनेशी कितपत सुसंगत आहे याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शक्ती कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे गेला आहे. त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे शासनास कळविले आहे. त्या त्रुटी दूर केल्या तर राज्यात याबाबत एक चांगला कायदा येऊ शकेल असेही वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा- VIDEO: साताऱ्यात कुमठे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आमदार शशिकांत शिंदे-महेश शिंदेंच्या कार्यकर्त्यांत धुमचक्री

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी व संस्थेच्या विविध कामांसाठी वळसे पाटील साताऱ्यात आले होते.या कर्मचाऱ्यां नी हे आंदोलन मागे घेतले.यावेळी ते माध्यमांशी बोलत होते

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former home minister dilip valse patil on law for love jihad dpj