जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले. यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक व्हिडीओ ट्वीट करत थेट शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “माय-भगिनींच्या रक्तबंबाळ शिरावर भळभळणारी जखम महाराष्ट्राच्या समाजमनावर आता खोलवर रुतली आहे. ही संतापजनक घटना आहे.”

“प्रश्न मिटवायचा होता की चिघळवायचा होता?”

“हा कोणता अमानुषपणा? एखादा प्रश्न हाताळण्याची ही कोणती पद्धत? प्रश्न मिटवायचा होता की चिघळवायचा होता?”; असा प्रश्न मनसेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारला.

व्हिडीओत नेमकं काय?

मनसेने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे, “हे हिंदवी राज्य आहे, इथं आया-बायांची पुजा केली जाते. आंदोलकांना पांगवायचं असेल, तर त्यांच्या कमरेच्या खाली पायावर लाठीने मारायचं असतं, हा पोलिसांचा नियम आहे. मात्र, जालन्यात पोलिसांनी आंदोलकांच्या थेट डोक्यावर मारल्याचं दिसत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns tweet of jalna lathicharge criticize shinde fadnavis pawar government pbs