राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने कारवाई केली. गुरुवारी सकाळी ७ पासून ही कारवाई सुरु होती. स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या थकीत कर्जाज्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. जवळपास १० गाड्या जळगावात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर माजी खासदार आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सचे ईश्वरलाल जैन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे ईश्वरलाल जैन यांनी?

जळगावातले राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यानंतर ईश्वरलाल जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयकडून या प्रकरणात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्या फिर्यादीत काहीही अर्थ नाही असं ईश्वरलाल जैन यांनी म्हटलं आहे. तसंच सगळं काही व्यवस्थित होईल त्यासाठी थोडा वेळ लागेल असंही जैन म्हणाले. राजकीय आकसातून ही कारवाई करण्यात आली का? असं विचारलं असता त्यावर जैन म्हणाले की ही कारवाई राजकीय उद्देशाने झाली आहे असं वाटत नाही. ही कारवाई सीबीआयच्या तक्रारीनुसार झाली. मला बाकी काही चिंता नाही असंही जैन यांनी म्हटलं आहे.

ईडी पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली. ईडीकडून सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली असल्याची माहिती समोर आली.

कारवाईमध्ये ईडीचे एकूण ६० कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याची माहिती दिली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत पहिल्यांदाच ईडीचे पथक दाखल झाल्यानं सुवर्ण नगरीसह संपूर्ण जळगाव शहरात या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Was the ed action due to political pressure ishwarlal jain of rajmal lakhichand jewellers gave answer scj