मुंबई :  राज्यातील एखाद्या खेडेगावात असलेल्या आपल्या जिवलगापर्यंत पत्र पोहोचवायची गरज ते आज अवघे जग इंटरनेटच्या वेगावर धावत असताना ऑनलाइन खरेदीपासून घरोघरी खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन वितरण व्यवस्थेपर्यंत सगळीकडे महत्त्वाची ठरणारी गोष्ट ‘पिन कोड’. भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९७२ रोजी पत्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून ‘पिन कोड’ (पोस्टल इंडेक्स नंबर कोड) ही पद्धत अंमलात आणली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवदिनी या ‘पिन कोड’ची पन्नाशी साजरी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी टपाल खात्याचे कार्य सुलभ आणि अधिक वेगाने होण्यासाठी सुरू केलेली ही ‘पिन कोड’ पद्धत आज इंटरनेट आणि गुगल मॅपसारखे अद्ययावत तंत्रज्ञान असतानाही तितकीच गरजेची ठरत आहे. ‘पिन कोड’ नामक या सहा आकडय़ांत तुम्ही कुठल्या राज्यात राहता?, तुम्ही ज्या शहरात राहता ते कुठल्या राज्यात आहे? तुमच्या भागाच्या अगदी जवळचे टपाल खाते कोणते? ही सगळी माहिती दडलेली असते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of the pin code which turns 50 on independence day 2022 zws
First published on: 16-08-2022 at 04:54 IST