ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलने करु नयेत, असे आवाहन करतानाच साखर कारखान्यांनी किमान आधारभूत किंमत दिली नाही तर कारखानदारांवर फौजदारी खटले दाखल करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. परवडत नसेल, तर खुशाल कारखाने बंद करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऊसासाठी साखर कारखान्यांना किमान आधारभूत किंमत देता यावी, यासाठी केंद्राच्या मदतीवरच राज्य सरकारची मदार आहे. केंद्र सरकारने ऊसासाठी उताऱ्यानुसार २२०० ते २६०० रुपये प्रतिटन इतकी किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. साखरेचे दर कोसळत असल्याने आणि वाढलेला खर्च लक्षात घेता ती देणेही कारखानदारांना परवडत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar mills to pay base price to avoid action