नागपूर : मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यावर तिच्या पतीच्या हत्येचा आरोप आहे. २३ मे रोजी दुपारी १.४३ वाजता सोनमने तिच्या सासू उमा रघुवंशी यांना इंदूरमध्ये फोन केल्याचे आढळले. सासूने सोनमला विचारले होते की तिने जेवण केले आहे की नाही, ज्यावर सोनमने उत्तर दिले की आई मी उपवास करत आहे. अशा अनेक प्रकारे खोटे बोलून सोनमने हा संपूर्ण कट रचला आहे. मात्र, या प्रकाराने आता हनिमूनला जाताना चांगलीच धडकी भरणार हे मात्र निश्चित. त्यामुळे यापुढे तुम्ही हनिमूनचे प्लॅनिंग करत असाल तर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे नक्की वाचा.

लग्न झाल्या झाल्या थेट लग्न मंडपातून थेट हनीमूनला जाणे अजिबात गरजेचे नाहीये. तुम्ही शांतपणे या डेट्सचं प्लॅनिग करु शकता. कुठलाही प्लॅन करत असताना त्याची माहिती आपल्या परिवाराला द्या. सोबतच जवळच्या मित्र, मैत्रिणींना माहिती देऊन ठेवा. आई वडिलांना माहिती असल्यास कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यांना माहिती असेल. कोणत्याही हनीमून स्वीटची बुकिंग करण्यापूर्वी त्या जागेचे रिव्ह्यू जाणून घेणे विसरु नका. कारण अनेकदा घाईगडबडीत बुकिंग केली जाते. पण नंतर तिथे त्यानुसार सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच हनीमून स्वीटमध्ये कॅमेरे लावण्यात आल्याच्या बातम्याही येत असतात. त्यामुळे कुठलही बुकिंग करताना हॉटेलची योग्य माहिती आधी घ्यावी. केवळ सुविधाच नाही तर हॉटेलचीही माहिती आधी घ्यावी.

उत्साहात निष्काळजीपणा करु नका – हनीमून प्लॅन करताना सर्वातआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही निष्काळ तर करत नाही आहात ना! तुमचे भलेही काही विचार असोत, पण जास्तीत जास्त लोकांना हा प्लॅन सीक्रेट ठेवायचा असतो. असे होऊ नये की, उत्साहाच्या भरात तुम्ही तुमचा प्लॅन दुसऱ्या कुणाला सांगितला. याने वेळेवर काहीही अडचण निर्माण होऊ शकते.

एकमेकांशी बोला

हनीमूनचा सरप्राइज प्लॅन एक चांगली रोमॅंटिक आयडिया होऊ शकते. पण हे विसरु नका की, ही तुम्हा दोघांची ट्रिप आहे. काही ठिकाणांची तुम्हाला जशी आवड असू शकते, तशीच आवड तुमच्या पार्टनरला वेगळ्या ठिकाणांची असू शकते. त्यामुळे यासंबंधी काही प्लॅन करण्याआधी एकमेकांसोबत बोला.

बजेटची काळजी

कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला बजेट आधीपासूनच तयार ठेवायला हवं. कारण या बजेट प्लॅनिंगवरच तुमच्या सर्व बुकिंगपासून ते शॉपिंगपर्यंतच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. बजेट आधीच प्लॅन केला तर तुमचं सर्व प्लॅनिंग योग्यप्रकारे होऊ शकतं. तुम्हाला वेळेवर कोणतीही अडचण येणार नाही.