महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सिकलसेलच्या २० टक्के रुग्णांना अपंगाचे तात्पुरते प्रमाणपत्र मिळते. परंतु, याआधी या रुग्णांना प्रत्येक वर्षी अपंगत्वाची पडताळणी करून प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. आता केंद्र सरकारने या नियमात बदल करून या अपंगांना तीन वर्षांत एकदा पडताळणीची मुभा दिली आहे. त्यामुळे सिकलसेलग्रस्तांचा वारंवार रुग्णालयात चकरा मारण्याचा मन:स्ताप कमी होणार आहे.केंद्र सरकारने सिकलसेलग्रस्तांना अपंगांच्या संवर्गात टाकले. त्यामुळे सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्ताचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांना अपंगांचे स्थायी प्रमाणपत्र तर कमी प्रमाण असलेल्यांना तात्पुरते प्रमाणपत्र दिले जाते. या कमी प्रमाण असलेल्यांची प्रत्येक वर्षी पडताळणी करून अपंग प्रमाणपत्र दिले जात होते. त्यामुळे या रुग्णांना वारंवार पायपीट करावी लागत होती. आता ही पायपीट थांबणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sickle cell sufferers now verified in three years for disability certificate zws
First published on: 15-08-2022 at 05:59 IST