शेतीमालाच्या थेट विक्रीनंतरही ग्राहकांना फटका
राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट पणन करण्याची मुभा दिली असताना शेतमाल आठवडय़ानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात उतरविला जात आहे. त्यामुळे सोमवारी भाजी बाजारात ६७५ तर मंगळवारी ४४० ट्रक भरून भाजी आली. शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी दलाली आता खरेदीदारांकडून घेतली जात असल्याने त्याचा फटका अखेर ग्राहकांना बसला. स्थिती यापूर्वी होती तशी आज कायम आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चढेच असून किरकोळ बाजारात ते कमी होण्याचे नाव घेईनासे झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2016 रोजी प्रकाशित
भाज्यांचे दर चढेच
भाजी बाजाराप्रमाणे कांदा बटाटा बाजारात मंगळवारी १८७ ट्रक फळबाजारात २०८ वाहने आल्याची नोंद आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-07-2016 at 02:07 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable prices still high in navi mumbai