-
आपल्यापैकी अनेकजण रत्न परिधान करतात. बहुतेकजण सल्ल्यानुसार रत्न धारण करतात तर बरेचजण आवड म्हणून ते धारण करतात.
-
भाग्य उज्वल करण्यासाठी आणि अनेक समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हे रत्न धारण केले जातात.
-
रत्न शास्त्रानुसार, जेव्हा ते परिधान करताना अत्यंत काळजी घेतली जाते तेव्हाच रत्न चांगले कार्य करतात.
-
अनेकदा असे देखील होते की रत्ने चांगले परिणाम देत नाहीत. अशावेळी काय करावे ते जाणून घेऊया.
-
कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी, त्याचा स्पर्श आपल्या प्रमुख देवतेच्या चरणांना करावा किंवा देवाचे ध्यान करावे.
-
रत्न धारण करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. त्यानंतरच रत्न धारण करावे.
-
रत्नशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, कोणतेही रत्न धारण केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा बदलू नये. रत्न किमान ६ महिने धारण केले पाहिजे. तेव्हाच रत्नाचा प्रभाव पडतो.
-
तुटलेले रत्न कधीही परिधान करू नये असे ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे. याउलट, परिधान केलेल्या रत्नामध्ये तडे गेले असल्यास ते ताबडतोब काढून टाकावे.
-
येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (Photo : Pixabay)
रत्नांची अंगठी घातल्यानंतरही पालटत नाही नशीब, तर ‘या’ गोष्टी नक्की करा
रत्न शास्त्रानुसार, जेव्हा रत्न परिधान करताना अत्यंत काळजी घेतली जाते तेव्हाच ते चांगले कार्य करतात.
Web Title: Fortune does not change even after wearing a gemstone ring try these things pvp