• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. assam flood situation worsens 44 dead over 13 lakh affected psd

आसामवर अस्मानी संकट

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी सामना करतो आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आसामवर खडतर काळात अस्मानी संकट कोसळलं आहे. (सर्व छायाचित्र - पीटीआय)
    1/15

    गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी सामना करतो आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आसामवर खडतर काळात अस्मानी संकट कोसळलं आहे. (सर्व छायाचित्र – पीटीआय)

  • 2/15

    संकट आलं की चारही बाजूंनी येतं असं म्हणतात…आसाम याचा आता पुरेपूर प्रत्यय घेतोय. सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे आसाममधली परिस्थिती बिकट झाली आहे.

  • 3/15

    अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले असून ४४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  • 4/15

    ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा इशारा देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १६ जुलैपर्यंत या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • 5/15

    गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, सोनीतपूर या जिल्ह्यांना ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर फटका बसलेला आहे. याव्यतिरीक्त धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरूप, मोरीगाव, नागाव अशा महत्वाच्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

  • 6/15

    NDRF ने राज्यात पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये बचावकार्य सुरु केलं आहे.

  • 7/15

    काझरिंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही या पुराचा फटका बसला असून आतापर्यंत ४१ प्राण्यांनी यात आपला जीव गमावला आहे. ४९ प्राण्यांना अधिकाऱ्यांनी सुरक्षीत स्थळी हलवलं आहे.

  • 8/15

    आसाम सरकारने १४ जिल्ह्यांमध्ये २२४ रिलीफ कँपची व्यवस्था केली आहे, यात अंदाजे २१ हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 9/15

    इतक्या खडतर काळातही काही विक्रेते तग धरुन आहेत.

  • 10/15

    मिळेल त्या साधनाने पुरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक करत आहेत.

  • 11/15

    आजुूबाजूला संकट ओढावलेलं असतानाही लोकं पाळीव प्राण्यांना जमेल तशी मदत करत आहेत.

  • 12/15

    प्रत्येक जण आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करत आहे.

  • 13/15

    बहुतांश सखल भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे.

  • 14/15

    बांबू आणि झाडांच्या खोडाचा वापर करुन आपला बचाव करत बाहेर पडताना एक कुटुंब

  • 15/15

    करोनाचा सामना आणि वरु्णराजाची अवकृपा यामुळे आसाम सध्या दुहेरी पेचात सापडलं आहे.

Web Title: Assam flood situation worsens 44 dead over 13 lakh affected psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.