पुणे : पावसाळा संपल्यानंतर पुढे महिनाभर ओढे, नाल्यांमधून काही प्रमाणात पाणी वाहत असते. हे पाणी एक लाख वनराई बंधारे बांधून अडविण्याचा कृषी विभागाचा संकल्प आहे. लोकसहभागातून कच्चे बांध घालून अडविलेल्या या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी करण्याचा आणि जास्तीत-जास्त पाणी जमिनी मुरवून जलसंधारणाला गती देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर इतके आहे, तर रब्बी हंगामातील क्षेत्र ५१.२० लाख हेक्टर इतके आहे. खरिपाच्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र खूपच कमी आहे. पिकाला पाणी देण्याची खात्रीशीर सोय नसल्यामुळे रब्बीचे क्षेत्र राज्यात कमी आहे. या रब्बीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरीही सिंचनाच्या सोयींअभावी अपेक्षित यश मिळत नाही.

More Stories onशेतीFarming
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra agriculture department planning to make one lakh mini dam for irrigation zws
First published on: 04-10-2022 at 01:51 IST