राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘समाजाच्या जीवनात हवी ती क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य साहित्यिकांत आहे. त्यांनी ठरवले तर वाणी किंवा लेखणीने एखाद्याचा विनाशही करू शकतात आणि अमृतसंजीवनीप्रमाणे स्मशानातसुद्धा नंदनवन निर्माण करू शकतात, एवढे प्रचंड सामर्थ्य साहित्यिकांत आहे,’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम येथे साहित्यिक व विद्वज्जनांशी हितगुज करताना म्हणतात. ‘एके काळी साहित्यिकांनी गोठय़ातसुद्धा देवाची स्थापना केली आणि सर्व समाजाला भजनी लावले; परंतु आज आपणास गोटे बनलेल्या मानवात देवत्व जागवायचे आहे. गाद्यागिरद्यांवर लोळून करुणरसाची कवने आळवणाऱ्यांना ही गोष्ट पटवून द्यावयाची आहे की, दु:खितांचा आर्त टाहो ऐकून धावून जाणारा व आपल्या सेवेने त्यांच्या दु:खाश्रूंच्या जागी आनंदाश्रू निर्माण करणारा सहृदय सेवक हाच खराखुरा साहित्यिक आहे,’ असे महाराज सांगतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara rashtrasant tukadoji maharaj social system in village zws
First published on: 04-02-2023 at 02:15 IST