हर्षवर्धन वाबगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गुणवत्तेबद्दल किती भ्रम बाळगाल?’ हा प्रशांत रूपवते यांचा लेख (१९ मार्च) वाचला. रूपवते यांनी नोबेल विजेते प्रा. अभिजीत बॅनर्जी, ईस्टर दफ्लो व सहकाऱ्यांच्या संशोधनाचा आरक्षण समर्थनार्थ दाखला दिलेला आहे. माझ्या वाचनात वरील दाम्पत्याचे जे संशोधन आले आहे ते राजकीय आरक्षणासंबंधी आहे; शैक्षणिक व नोकऱ्यांतील आरक्षणावर ते कितपत लागू होते असा प्रश्न पडतो. याउपर, प्रा. बॅनर्जी यांनी असेही म्हटले होते की, “… as more and more persons from a particular caste got elected, they became the worst in terms of corruption…There is tolerance of people from your own caste of people who are corrupt. They say that they come from ‘their’ party…” म्हणजे, जातीनिहाय आरक्षणामुळे जातींचा पगडा उलट घट्ट होतो. असो. माझ्या मते, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच नोकरीतील आरक्षण हे औषधासारखे आहे. त्याचे काही दुष्परिणाम आहेत. तरीही, एकंदर गोळाबेरीज केली तर फायदाच जास्त होतो; त्यामुळे, सध्याच्या काळात आरक्षण निकडीचे आहे. परंतु, त्याला पर्यायी नव्हेत, तर पूरक असे अनेक उपक्रम हाती घेणे योग्य ठरेल.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To change the mindset iit bombay should take one step forward asj
First published on: 22-03-2023 at 11:12 IST