विजय पांढरीपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकालच्या कॉलेजला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या नावे ‘हाजिर हो!!’ असा कोर्टात करतात तसा पुकारा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी ज्युनियर कॉलेजपासून तर पदवी, पदव्युत्तर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्याची गैरहजेरी हा चिंतेचा विषय झाला आहे. याला कोणतेही कॉलेज, कोणताही अभ्यासक्रम अपवाद नाही. अगदी इंजिनीअरिंग, मेडिकल, सायन्स सगळीकडे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची समस्या आहे. प्रॅक्टिकल असते तिथे गरज म्हणून, उपकार केल्यासारखे कसे तरी प्रयोग केले जातात. बाकी जर्नल लिहिणे म्हणजे कॉपी ही पूर्वापार परंपरा आहे. ७५ टक्के हजेरी हवीच हा नियम फक्त कागदावर. अनेक प्राध्यापकांनी हजेरी घेणे सोडून दिले आहे. प्राचार्यांना पाठवायची हजेरी ही सत्र संपले की उपचार म्हणून पाठवलेला, मॅनेज केलेला डेटा. सरकारी, खासगी सर्वच संस्थांत सारखी परिस्थिती.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why students not attending college class need to think about this asj
First published on: 07-12-2022 at 10:47 IST