अंबरनाथ: कर्जतपासून बदलापूर, अंबरनाथ आणि थेट डोंबिवली आणि आसपासच्या शहरांतील वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काटई नाका ते कर्जत रस्त्याचा काही भाग काँक्रीटचा झाला असला तरी बहुतांश  भागांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना या रस्त्याला शेजारच्या बैठय़ा चाळीतीळ सांडपाणी आणि कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. याच नागरी सांडपाण्यामुळे रस्त्याला खड्डे पडत असल्याचे समोर आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांत काटई नाक्यापासून ते थेट बदलापूपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उद्योग, कंपन्या, नामांकित गृह प्रकल्प, हॉटेल आणि विविध व्यावसायिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचा काटई ते खोणी हा भाग काँक्रिटचा करण्यात आला. त्यामुळे या भागातील वाहतूक वेगवान झाली आहे. त्याचा वाहनचालकांना फायदाही होतो आहे. त्याच वेळी खोणीपासून पुढे बदलापूपर्यंत विविध भागांत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खोणी फाटा ते नेवाळी नाका या भागात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तर काटई नाका ते थेट नेवाळी आणि पुढे उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या भागात रस्त्याच्या दोन्ही कडेला कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drivers face trouble due to potholes on katai karjat road zws
First published on: 25-05-2022 at 00:43 IST