पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य खुलते. हिरवीगार झाडी, धो धो पाऊस, खळखळून वाहणारे धबधबे, झरे, दुथडी भरून वाहणारी नदी….अशा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात अनेक पर्यटक उत्सुक असतात. त्यामुळे वर्षा विहारासाठी अनेक लोक विविध धबधबे, डोंगर-दऱ्या, मंदिरे, आणि गड-किल्यांना भेटी देतात. वर्षा विहार करणे नक्कीच एक आनंददायी अनुभव आहे पण त्यासाठी जीव धोक्यात घालण्याची आवश्यकता नाही. हीच चूक अनेक लोक करतात अन् स्वत:चा जीव गमावतात. सोशल मीडियावर अशा अपघातांचे कित्येक व्हिडिओ समोर येत असतात.
नुकताच कुंडमळा येथील नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटाना घडली ज्यामुळे ४ लोकांना जीव गमवावा लागला. गेल्यावर्षी लोणवळा येथील भूशी धरणामध्ये एक कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. कुंभे धबधबा येथे सेल्फीच्या नादात पाय घसरून दरीत पडल्याने अन्वी नावाच्या इन्फ्युएन्सरचा मृत्यू झाल्याची घडना घडली होती. अशा घडना वांरवार समोर येत असूनही अनेकदा लोक आपला जीव धोक्यात टाकून पर्यटन स्थळांना भेट देतात. दरम्यान, देवकुंड धबधबा येथे पर्यंटकांची प्रचंड गर्दी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पावसाळ्यात पर्यटन स्थळी भेट देणार्या पर्यटकांच्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच देवकुंड धबधब्यावरील पर्यटकांच्या गर्दीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पर्यटकांची इतकी गर्दी झालेली दिसत आहे की,”तिथे पाय ठेवायलाही जागा उरलेलही दिसत नाही. एवढ्या गर्दीतही उत्साही पर्यटक मोठ्या संख्येने पाण्यात उतरलेले दिसत आहेत. अनेक लोक खडकांवर धोकादायकपणे उभे असल्याचे दिसत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे देवकुंड धबधब्याचे सौंदर्य कमी होत आहे.
इंस्टाग्रामवर punewatavaran नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये स्वतःच जीव स्वतःच्या हातात आहे हे लक्षात घेऊन फिरायला जा” असे लिहिले आहे. व्हिडिओ १५ जून रोजी पोस्ट केलेला आहे.
पावसाळ्यात डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असतो ज्यामुळे अचानक धबधबे, झरे, धरण किंवा नदीच्या पाण्याची पातळी वाढू शकते जे कोणाच्याही जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर जास्त धोकादायक ठिकाणी जाणे किंवा उगाच नको ते साहस करण्याच्या नादात लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. सततच्या पावसामुळे खडकांवर शेवाळ तयार होते ज्यामुळे ते निसरडे होतात ज्यावरून सहज कोणाचाही पाय घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असते. पण अनेकांना याचा विसर पडतो. अशा ठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करणे लोकांच्या जीवावर बेतू शकते. आयुष्य म्हणजे खेळ नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जंगता आला पाहिजे पण आयुष्य फक्त आनंदाने नव्हे तर सुरक्षितपणे जगता आले पाहिजे.