घरगुती इकोफ्रेण्डली गणपतींची मुंबईतील संख्या वाढत असून या वर्षी फक्त मुंबईत तब्बल ८० हजार लोकांनी इकोफ्रेण्डली गणपतीची स्थापना केली होती. हे यश ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या इकोफ्रेण्डली गणेशोत्सव स्पर्धेसारख्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व पर्यावरणप्रेमी लोकांचे आहे, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग यांनी ‘इकोफ्रेण्डली घरगुती गणेश स्पर्धा’ उपक्रमाची प्रशंसा केली.
‘लाईव्ह’ कारागिरी
बक्षीसवितरण सोहळा सुरू असताना कोल्हापूरचे शिल्पकार गुणेज गजानन आडवल यांनी दोन इकोफ्रेण्डली गणपतीच्या मूर्ती बनविल्या.
पर्यावरणाची काळजी घेणे हे राष्ट्रीय कर्तव्य
– संजय देवतळे,
पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री
उत्सव पर्यावरणस्नेही असावेत
– सचिन अहिर,
पर्यावरण व गृहनिर्माण राज्यमंत्री
प्रबोधन चळवळ सक्षम
-विद्याधर वैशंपायन,
अध्यक्ष, टीजेएसबी सहकारी बँक
विजेत्यांची नावे
संतोष घोलवणकर, विलेपार्ले – प्रथम पारितोषिक, संतोष व्हर्टेकर, शांतिवन मार्ग – द्वितीय पारितोषिक.
उत्तेजनार्थ -अमेय सुरेंद्र वैद्य, अनंत हरिषचंद्र शिंदे, अतुल काटदरे, फाल्गुनी आशित, गौरी शरद घोणे, किशोर रतीलाल पाटील, क्रांती प्रसन्नकुमार पाटील, मधुरा मिलिंद जोशी, मयूर मनोहर अजिंक्य, प्रज्ञा विनायक सहस्रबुद्धे, आश्विनी अमित मंजुरे, मानसी नाईक, प्रफुल्ल राज, प्रकाश दामोदर जाधव, प्रसाद आरविंद फाटक, रश्मी मतकरी, संदेश एम. पाटील, सुधाकर आंबेकर, उषा शिंदे, विनोद घोलप, संजय धोंडू कराड, आनंद जयंत लेले, राजेश दिवाकर कुलकर्णी, किरण पांढरकोटे, सरिता ए. गुजराथी.