तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत तहसील विभागाने योग्य नियोजन न केल्याने एकच गोंधळ उडाला. निवडणूक अधिकाऱ्यांना तहसीलदारांकडून भिन्न आदेश मिळाल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान जातपडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने अनेक उमेदवारांचे मनसुबे उधळले गेले. छाननी प्रक्रियेत जात पडताळणीअभावी अनेक उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने अनेक जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही निवडणूक अधिकाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीने घेतले. तर, काही अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र नसतानाही अर्ज दाखल करून घेतले. अर्ज नामंजूर करण्यात आल्यावर अनामत रक्कम परत देणे आवश्यक असताना ती परत देण्यात न आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-03-2014 at 08:50 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intermediate sections incorrect planning harms the candidates shot