तीव्र पाणीटंचाईमुळे ‘मोसंबीचा जिल्हा’ असलेली जालन्याची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून या तालुक्यात जिल्ह्य़ात सर्वात कमी पाऊस झाला.
माजी आमदार व घनसावंगी तालुक्यातील मूळ गाव असलेले काँग्रेसचे नेते विलासराव खरात यांनी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक गावांना भेटी दिल्या. त्यांनी सांगितले की, सरकारच्या विविध योजनांमुळे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात मोसंबी-डाळिंबासह फळपिकांची लागवड केली. सरकारचे अर्थसाह्य़ व स्वत: शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात जिल्ह्य़ात मोसंबी पीक घेतले. जालना जिल्ह्य़ात जवळपास ९० हजार ते १ लाख एकर क्षेत्र मोसंबीखाली असण्याचा अंदाज आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-01-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalna distrect is water shortage danger situation