ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई-नाशिक महामर्गावरील हायवे-दिवा येथील स्टेम पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून त्यामुळे शहरांचा पाणीपुरवठा आठवडय़ातून एकदा बंद ठेवण्यात येतो. असे असतानाच ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या हायवे-दिवा येथील स्टेम पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले असून परिसरातील शेतामध्ये हे पाणी साचले आहे.
मात्र, या बाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना गंधवार्ताच नव्हती. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
जलवाहिनीतून पाणी वाया गेल्याने ठाणे, भिवंडी व मीरा-भाईंदरवर पाणीटंचाईचे संकट
ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई-नाशिक महामर्गावरील हायवे-दिवा येथील स्टेम पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.
First published on: 24-01-2013 at 12:55 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhyander thane bhivandi ia danger of shortage of water because of loss of water from pipe line