पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी नारायण श्रीरंगी या आदिवासीची गोळय़ा घालून हत्या केल्याने गडचिरोली जिल्ह्य़ात दहशतीचे वातावरण आहे.  नक्षलवादी कमांडर रंजिता हिच्या अटकेनंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांना आवाहन दिले असून गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांनी काल पत्रके वाटून बदल्याची भावना व्यक्त केली. त्याचाच परिणाम नक्षलवाद्यांनी आदिवासींचे हत्यासत्र पुन्हा आरंभले आहे.
 सिरोंचा तालुक्यातील मोटला टेकडा या गावात नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री प्रवेश करून नारायण श्रीरंगी याच्या घरात प्रवेश केला. त्याला चौकात आणून गोळय़ा घालून ठार केल्यानंतर नक्षलवादी गावातून पसार झाले. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून श्रीरंगची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites killed aborigines