केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत सन २०२४ पर्यंत देशात १०० नवी विमानतळं उभारण्यात येतील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचबरोबर इतर दोन महत्वाच्या पायाभूत सुविधांची घोषणाही यावेळी करण्यात आली. यामध्ये प्रस्तावित दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चेन्नई-बंगळूरू द्रुतगती महामार्गाची घोषणाही यावेळी करण्यात आली.

आणखी वाचा – Budget 2020: सरकारी पदांच्या परीक्षेसंदर्भात अर्थमंत्र्यांची महत्वाची घोषणा

दरम्यान, सीतारामन यांनी २०२०-२१ साठी वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठीचा १.७ लाख कोटींचा एक आराखडा प्रस्तावित केला. तसेच ऊर्जा आणि अक्षय उर्जा क्षेत्रासाठी २२,००० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. त्याचबरोबर रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेच्या मालकीच्या जागांवर सोलर पॅनल उभारण्याचा विचार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2020 100 new airports to be developed under udan scheme aau