ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट आणि ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो. आज ३० ऑक्टोबरला मायावी ग्रह राहूने मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गुरु चांडाळ योग संपला आहे. हा योग संपल्याने काही राशींच्या लोकांच्या अडचणी दूर होऊन त्यांचे नशिब पालटण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस होणार सुरु?

मेष राशी

गुरु चांडाळ योग संपल्याने या राशींचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या लोकांच्या जीवनात आनंदच आनंदच येण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या लोकांना व्यवसायात खूप फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता असून समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ३ नोव्हेंबरपासून ‘या’ ४ राशींना होणार बक्कळ धनलाभ? शुक्रदेव गोचर करताच होऊ शकतो मोठा आर्थिक लाभ )

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांना गुरु चांडाळ योग संपल्याने चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षीत यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना मोठी वेतनवाढ मिळू शकते. नफा कमावण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. व्यावसायिकांना व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव देखील मिळू शकतो.

कन्या राशी

गुरु चांडाळ योग संपल्याने कन्या राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. या राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबात शुभ बातम्या मिळू शकतात. सामाजात प्रतिष्ठा देखील वाढू शकते. लग्नाची तयारी करणाऱ्या लोकांना चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahu gochar 2023 guru and yuti end 30 october these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb