अ गट : भूमिका
१) व्यासांकडून दिव्यदृष्टी प्राप्त झालेला, महाभारतातील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला सांगणारा त्याचा सारथी.
२) द्युतामध्ये द्रौपदी जिंकली जाणे योग्य नाही, असे स्पष्टपणे सांगणारा धृतराष्ट्राचा न्यायी पुत्र.
३) दुर्योधनाच्या सांगण्यावरून पांडवांचा काटा काढण्यासाठी ज्वालाग्राही लाक्षागृह ह्याने तयार केले.
४) पांडवाच्या विरुद्ध कपटनीतीचे धडे धृतराष्ट्र व दुर्योधनाला देणारा कुटिल राजनीतिज्ञ.
५) नकुल-सहदेवांचा मामा, पण युद्धातील कर्णाचा सारथी.
६) ‘न धरी शस्त्र करी मी’ असे म्हणणारा अर्जुनाचा सारथी.
७) धृतराष्ट्राचा पुत्र- जो महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढला.
८) अर्जुनाने ह्यास पुढे करून भीष्मांना युद्धात जर्जर केले.
९) इंद्रप्रस्थ येथील पांडवांच्या राजवाडय़ातील खास सभागृह ह्याने उभारून दिले, जिथे दुर्योधनाची फजिती झाली.
१०) न्यायी, धर्म आणि नीतिनिपुण, कुरूवंशाशी एकनिष्ठ, पांडवांचा हितचिंतक.
ब गट : व्यक्ती
अ) मयासुर आ) विदुर इ) कृष्ण ई) शल्य उ) शिखंडी ऊ) युयुत्सु ए) विकर्ण ऐ) संजय ओ) कणिक औ) पुरोचन