Shankar Sharma On Investment: दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी एका पॉडकास्टमध्ये शेअर बाजार आणि भारतीय गुंतवणूकदारांची मानसिक यावर भाष्य केले आहे. यामध्ये ते म्हटले आहेत की, भारतीय गुंतवणूकदार तुटक्या साधनांनी संपत्तीचा पाठलाग करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे मान्य करण्यास कोणीही तयार नाही.

‘एक्सप्लोरिंग माइंड्स’ पॉडकास्टमध्ये बोलताना शंकर शर्मा म्हणाले की, “लोक श्रीमंत का होत नाहीत याचे खरे कारण म्हणजे स्वयंशिस्तीचा अभाव. हे लोक अपयशी ठरतात कारण त्यांच्याकडे कौशल्य नाही असे नाही, तर ते स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहू शकत नाहीत. अनेकजण स्वतःचे तर्कशुद्ध आणि कठोर विश्लेषण करू शकत नाहीत म्हणून ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत”, असेही शंकर शर्मा यांनी म्हटले आहे.

यावेळी शंकर शर्मा यांनी, यशस्वी गुंतवणूक ही काही दूरदृष्टीवर अवलंबून असते हा समज फेटाळून लावला. ते म्हणाले, “गुंतवणुकीचा खेळ एखाद्या व्यक्तीमधील गूढ गुणवत्तेच्या आधारावर चालतोजो इतरांपेक्षा पुढे काय होईल हे चांगल्या प्रकारे पाहू शकतो हे म्हणणे, मूर्खपणाचं आहे,” असे ते म्हणाले.

शर्मा यांच्या मते, गुंतवणूकदारांच्या स्वयंशिस्तीबाबत चर्चा खूप कमी होते. विशेषतः कधी गुंतवणूक काढून घ्यायची याबाबत. “तुमची स्वयंशिस्त कालांतराने तुम्ही किती पैसे कमावणार हे ठरवते. पण भारतात याबद्दल अजिबात चर्चा होत नाही.”

पुढे बोलताना शंकर शर्मा म्हणाले की, “पोर्टफोलिओ दीर्घ कालावधीत, साधारणपणे तीन ते पाच वर्षांमध्ये बाजाराच्या सरासरी तिप्पट परतावाच्या तिप्पट देतो तेव्हा तुम्हाला गुंतवणूक काढून घ्यावी हे स्पष्ट होते. हे उदाहरण दाखवण्यासाठी दशकांपासून पुरेसा डेटा उपलब्ध आहे. हा अंदाज नाही, ही शिस्त आहे.”

दीर्घकालीन गुंतवणुकीच्या अति-कौतुकालाही शंकर शर्मांनी विरोध केला आहे. ते म्हणाले, “वॉरेन बफेट यांनी वयाच्या साठीनंतर त्यांचे बहुतेक पैसे कमावले. अशा गोष्टीं तुमचे बिल भरणार नाहीत. दीर्घकालीन गुंतवणूक ठीक आहे, परंतु शिस्तीशिवाय, ती फक्त सिद्धांत आहे.”

यावेळी शंकर शर्मा यांनी तरुण गुंतवणूकदारांना शर्मा यांनी एक स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, “जोपर्यंत जागतिक स्तरावर विचार करायला सुरुवात करणार नाही, तोपर्यंत २२ वर्षांच्या तरुणालाही बाजारातील बारकावे समजायला ६२ वर्षांचे व्हावे लागेल.”