या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘जीएस ३’ या पेपरबाबत जाणून घेणार आहोत. या पेपरमधील समाविष्ट विषयांच्या विविधतेमुळे या पेपरचा आवाका इतर जीएसच्या पेपरपेक्षा मोठा आहे. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी हा पेपर अवघड वा अपेक्षित गुण न मिळणारा पेपर आहे.

‘जीएस ३’ या पेपरच्या अभ्यासक्रमातील सर्व घटक नीट समजून त्याच्याशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास केल्यास आपणास अपेक्षित प्रश्न मिळतात. या प्रश्नांची मॉडेल उत्तरे तयार करून लेखनाचा सराव केल्यास या पेपरमध्ये आपण चांगले गुण मिळवू शकतो.

या पेपरमध्ये खालील घटकांचा समावेश होतो

१. अर्थव्यवस्था व आर्थिक विकास

२. कृषी

३. विज्ञान व तंत्रज्ञान

४. पर्यावरण व जैवविविधता

५. सुरक्षा

६. आपत्ती व्यवस्थापन

आयोगाद्वारे दिलेला अभ्यासक्रम

अर्थव्यवस्था व आर्थिक विकास

● भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनशी संबंधीत मुद्यो, साधनसंपतीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार.

● सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या.

● सरकारी अर्थसंकल्प.

● अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्याोगिक धोरणातील बदल आणि औद्याोगिक विकासावर त्यांचे परिणाम.

● पायाभूत सुविधा: ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी.

● गुंतवणूक प्रतिमाने.

भारतीय अर्थव्यवस्थेला समजून घेणे या पेपरमध्ये अपेक्षित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने त्यासाठीच्या उपाययोजना, या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या इ. बाबींचा अभ्यास करायला हवा. २०२४ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेत विचारलेला पुढील प्रश्न बघा झ्र

● प्र. भारतातील सुधारणांनंतरच्या काळात सामाजिक सेवांवरील सार्वजनिक खर्चाचा पॅटर्न आणि ट्रेंड तपासा. समावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे कितपत सुसंगत आहे ते सांगा?

अशा प्रश्नांसाठी भारताची आर्थिक पाहणी हा स्त्रोत सर्वाधिक विश्वासनीय आहे. खालील आकृतीत भारतातील सार्वजनिक सेवांवरील खर्च दर्शविला आहे.

याचा सकारात्मक परिणाम जरी दिसत असला तरी अजूनही काही आव्हाने समोर आहेत ज्यात प्रादेशिक विषमता, अपुरा आरोग्यसेवा खर्च आणि कल्याणकारी योजनांमधील गळती यांचा समावेश होतो.

कृषी

● देशाच्या विविध भागातील मुख्य पीके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई-तंत्रज्ञान.

● प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली – उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा; शिलकी साठा व अन्नसुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र.

● भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्याोग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.

● भारतातील जमीन सुधारणा.

वर सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रमातील घटक समजून घ्यायला हवेत. उदा. भारतातील जमीन सुधारणांचा अभ्यास करताना जमीन सुधारणा म्हणजे काय? जमीन सुधारणांची गरज का भासली? त्यासाठी केलेल्या उपाययोजना व त्यातून नेमके काय परिणाम झालेत ते समजून घ्यायला हवे. यावर २०२४ मध्ये विचारलेला पुढील प्रश्न बघा –

● प्र. देशाच्या काही भागांमध्ये जमीन सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणते घटक जबाबदार होते? सविस्तर सांगा.

विज्ञान व तंत्रज्ञान

विज्ञान व तंत्रज्ञान – घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम.

विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.

माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या.

जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्यांचा विचार करता २०२४ मध्ये आयोगाने विचारलेला पुढील प्रश्न बघा –

● प्र. जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत बौद्धिक संपदा हक्कांची सध्याची जागतिक परिस्थिती काय आहे? पेटंट दाखल करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी, अजूनही फक्त काही वस्तूंचेच व्यापारीकरण झाले आहे. या कमी व्यापारीकरणामागील कारणे स्पष्ट करा.

पर्यावरण व जैवविविधता

संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण.

आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, लवचिक समाज.

सुरक्षा

● विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे.

● अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका.

● संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईटची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध.

● सुरक्षा आव्हाने आणि सीमाक्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध.

● विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश.

३१ मार्च, २०२६ पर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य शासनाने ठेवले असून २०२५ च्या मुख्य परीक्षेत यासंबंधीचा प्रश्न विचारला जावू शकतो. २०२४ च्या मुख्य परीक्षेत दहशतवादावर विचारलेला पुढील प्रश्न बघा –

● प्र. देशभरात नार्को-दहशतवाद हा एक गंभीर धोका म्हणून कसा उदयास आला आहे ते स्पष्ट करा. नार्को-दहशतवादाचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवा.

संदर्भ साहित्य : १. भारताची आर्थिक पाहणी

२. भारताचा अर्थसंकल्प

३. एनसीईआरटी वर्ग १० झ्र आर्थिक विकास समजून घेणे

४. एनसीईआरटी वर्ग ११ झ्र भारतीय आर्थिक विकास

५. एनसीईआरटी वर्ग १२ झ्र मॅक्रोइकनॉमिक्स

६. स्पॉटलाईट नोट्स

७. भारतीय अर्थव्यवस्था – रमेश सिंह

८. भारतातील अंतर्गत सुरक्षेसाठीची आव्हाने – अशोक कुमार आणि विपुल अनेकांत

९. आपत्ती व्यवस्थापन व सायबर सुरक्षा झ्र इग्नू नोट्स

१०. नीती आयोग अहवाल

११. इंडिया इयरबुक

१२. लोकसभा प्रश्न- उत्तरे.

अभ्यासक्रमातील सर्व घटक समजून घ्या. स्वत:च्या नोट्स बनवून त्याबरोबर नियमित लेखन सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

sushilbari10 @gmail. com