सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाचा मुकाबला करण्याचा एक मार्ग आहे असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले.
उपासना विद्यापीठात बोलताना त्यांनी सांगितले की, दहशतवादाला धर्माचा आदर नसतो, सीमा नसतात, राष्ट्रीयत्व नसते. विनाश एवढा एकच हेतू त्यात असतो. आज जगापुढे दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. शाश्वत शांतता मिळवण्यासाठी मानवतेची नैतिक व बौद्धिक वचनबद्धता महत्त्वाची आहे. केवळ राजकीय व आर्थिक करार करून शाश्वत शांतता मिळणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tagore gandhis ideas best way to counter terrorism pranab mukherjee