कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्लीतील सहापैकी चार दौरे हे विकास कामासाठी झाले आहेत. भाजप नेतृत्वामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही, अशा शब्दात भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची सारवासारव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात महागाई वाढत चालली आहे. हा विरोधकांनी केलेला बागलबुवा आहे. गरिबांवर कोणतेही कर नाहीत. जीएसटीचा त्यांना कोणताही त्रास झालेला नाही, असेही ते म्हणाले. भाजप प्रादेशिक पक्ष संपत असल्याच्या आरोपाचा बावनकुळे यांनी इन्कार केला. बिहारमध्ये कमी जागा असूनही नितेश कुमार यांना मुख्यमंत्री केले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाविकास आघाडीचे ४५ दिवसाचे सरकार असताना केवळ चार निर्णय घेतले. तर विद्यमान सरकारने अल्पकाळात ३२ निर्णय घेऊन कार्यक्षमता सिद्ध केली आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील ओबीसी आरक्षणाचे वास्तव मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister shinde visit delhi development works chandrasekhar bawankule cabinet expansion ysh