बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.
#TeamIndia win by 30 runs to clinch the three-match series 2-1.#INDvBAN pic.twitter.com/vChBI1jjxW
— BCCI (@BCCI) November 10, 2019
भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. नईम आणि मिथून यांच्यात चांगली भागीदारी होत असताना मिथून २७ धावांवर बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईमही मोक्याच्या वेळी ८१ धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशचा डाव १४४ धावांत आटोपला. दिपक चहरने एका हॅटट्रिक घेत ७ धावांत ६ बळी टिपले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

Highlights
दीपक चहरची हॅटटà¥à¤°à¤¿à¤•; à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤¾ बांगलादेशवर मालिका विजय
????????? ??????????? ??????? ??? ????? ?? ?? ???????? ???? ????? ????????? ???????????? ????? ??????? ????? ??????. ?????? ????? ??? ?? ?? ????? ??????? ????? ???????????? ??????? ????????????? ??? ??????? ?????? ????? ????. ?? ????????? ?????? ?????? ???? ????? ? ???? ???? ? ??? ????? ??? ??????? ?????? ?-? ??? ??????? ????.
शà¥à¤°à¥‡à¤¯à¤¸, राहà¥à¤²à¤šà¥€ दमदार अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•े; बांगलादेशपà¥à¤¢à¥‡ १à¥à¥« धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
?????? ????? (??) ??? ?? ?? ????? (??) ??????? ????? ???????????? ??????? ?? ????? ? ??? ??? ???? ?????? ??? ????????????? ??? ??????? ?????? ?????. ???? ????????? ?? ?????? ?? ??????? ???????? ???? ????.
बांगलादेशने नाणेफेक जिंकली; पà¥à¤°à¤¥à¤® गोलंदाजी
???? ??? ????????? ?????????? ????? ??? ????? ?? ?? ????? ?? ??????????? ????? ??? ???. ?? ???????? ??????????? ??????? ????????????? ???? ??????? ????? ?????????? ?????? ????? ???.
बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.
शफिउल इस्लाम हवेत फटका खेळताना बाद झाला आणि दीपक चहरला चौथा बळी मिळाला.
कर्णधार महम्मदुल्लाह त्रिफळाचीत मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याने १० चेंडूत ८ धावा केल्या. त्यामुळे आता बांगलादेश पराभवाच्या छायेत आहे.
नईम पाठोपाठ शिवम दुबेने अफिफ हुसेनला पहिल्याच चेंडूवर बाद केले. पण त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याला बळी मिळवता आला नाही. त्यामुळे त्याने हॅटट्रिकची संधी गमावली. मात्र त्याने एकूण ४ षटकात ३ बळी टिपले.
एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईम ८१ धावा माघारी परतला. नईमला शिवम दुबेने त्रिफळाचीत केले. नईमने १० चौकार आणि २ षटकार खेचले.
या मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेने तिसऱ्या सामन्यात पहिला बळी टिपला. त्याने धोकादायक अनुभवी फलंदाज मुश्फिकूर रहीम याला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले.
नईमच्या साथीने बांगलादेशचा डाव सावरणारा मोहम्मद मिथून २९ चेंडूत २७ धावा करून माघारी परतला. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला.
डावखुरा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद नईम याने ३४ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलें. त्यासोबत त्याने मोहम्मद मिथूनच्या साथीने बांगलादेशचा डावही सावरला.
वेगवान गोलंदाज दीपक चहरने २ चेंडूत २ बळी टिपले. धोकादायक ठरू शकणारा सलामीवीर लिटन दास स्वस्तात बाद झाला. त्याने ९ धावा केल्या. तर त्याच्याच पुढच्या चेंडूवर सौम्या सरकार शून्यावर झेलबाद झाला.
श्रेयस अय्यर (६२) आणि के एल राहुल (५२) यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या आणि बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली.
आपले पहिलेवहिले टी २० शतक झळकावणारा श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ६२ धावा करून झेलबाद झाला. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार लगावले.
युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने धडाकेबाज खेळी करत २७ चेंडूत अर्धशतक झळकावले.
दमदार अर्धशतक ठोकल्यानंतर लोकेश राहुल लगेचच माघारी परतला. त्याने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या.
बराच काळ फॉर्मशी झगडत असलेला लोकेश राहुल याला अखेर सूर गवसला. ३३ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने त्याने अर्धशतक झळकावले.
रोहितनंतर शिखर धवनही लवकर माघारी परतला आणि भारताला दुसरा धक्का केला. त्याने ४ चौकारांसह १६ चेंडूत १९ धावा केल्या.
कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारताला पहिला धक्का बसला. त्याने ६ चेंडूत २ धावा केल्या.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी २० सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्लाह याने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.