Shashank Singh on Shreyas Iyer After PBKS IPL 2025: पंजाब किंग्सचा संघ आयपीएलचे जेतेपद पटकावण्यापासून एक पाऊल मागे राहिला. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जच्या खेळाडूंची कामगिरी खूपच खराब राहिली आणि त्यामुळे संघ १८ वर्षांनंतर पहिल्यांदा जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. मात्र, या अंतिम सामन्यानंतर पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

शशांक सिंगने संघाचा कर्णधार श्रेयसबद्दल असं काही म्हटलंय की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या हंगामाच्या अंतिम सामन्यात शशांक सिंगने शानदार अर्धशतक झळकावले, परंतु तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यामुळे पंजाब किंग्जचे त्यांचे पहिले आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.

आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. पण या सामन्यात शशांक सिंगने मोठी चूक केली होती. संघाला त्याची सर्वात जास्त गरज असताना तो धावबाद झाला. यावेळेस श्रेयस अय्यर मैदानावरच त्याच्यावर संतापला होता. याशिवाय सामन्यानंतर हात मिळवतानाही श्रेयस त्याच्यावर चांगलाच वैतागला होता.

शशांक सिंगने नुकत्याच दिलेल्या इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे आणि तो म्हणाला श्रेयसने जे केलं ते योग्य केलं. मला असंच हवं होतं. शशांक सिंग श्रेयस त्याच्यावर संतापला होता याबाबत सांगताना म्हणाला, “बरोबर होतं. अय्यरने तर माझ्या कानाखाली मारायला हवी होती. अंतिम सामन्यापर्यंत माझे वडिलही माझ्याशी बोलत नव्हते. मी खूप कॅज्युअल होतो. मी त्यावेळेस गार्डनमध्ये पण नाही बीचवर चालत फिरत होतो. तो सामन्यातील खरंच महत्त्वाचा टप्पा होता. श्रेयसने मला सांगितलं मला तुझ्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा नाहीये, पण नंतर तो मला डिनरसाठी घेऊन गेला.”

मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये शशांक सिंगला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी, त्याने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी केली आणि नाबाद ६१ धावा केल्या. त्याच्या या खेळीचे चाहत्यांनी कौतुक केले. पण, शशांक त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.