आरसीबी वि.पंजाब किंग्स अंतिम सामन्यात क्षणाक्षणाला कलाटणी घेत आहे. दोन्ही संघ सामन्यात कायम आहेत. यादरम्यान पंजाब किंग्सला मात्र कर्णधार श्रेयस अय्यरच्या रूपात मोठा धक्का बसला. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. आरसीबीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १९०धावा केल्या आहेत.
प्रभसिमरन सिंग आणि जोश इंग्लिसने पॉवरप्लेसह संघाचा डाव सावरला. प्रियांश आर्य पाचव्या षटकात २४ धावा करत बाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंग २६ धावा करत बाद झाला. तर जोश इंग्लिसने ३९ धावा करत चांगली खेळी केली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर अय्यर फलंदाजीला आला.
रोमारियो शेफर्डला गोलंदाजी सोपवण्यात आली होती. ज्याने हेझलवूडच्या षटकात प्रभसिमरनचा झेल सोडला. शेफर्डच्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर फटका खेळायला गेला, पण बॅटची कड घेत चेंडू जितेश शर्माच्या हातात गेला आणि संघाला मोठी विकेट मिळाली. श्रेयस अय्यर २ चेंडूत १ धावा करत बाद झाला. श्रेयसची विकेट खूप मोठी होती. कारण श्रेयसने एकट्याने ८७ धावांची खेळी करत मुंबईला याच मैदानावर पराभूत केलं होतं.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना आजवर फक्त २ वेळा संघांनी विजय मिळवला होता. या रेकॉर्डप्रमाणे आरसीबी आता या मोठ्या विकेटनंतर विजयाच्या दिशेने अग्रेसर होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. श्रेयस अय्यर हा पंजाबच्या फलंदाजीतील मोठा दुवा आहे. ज्याने यंदाच्या मोसमात ६०० धावांचा पल्ला गाठला. श्रेयस अय्यर शेफर्डच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर स्वत:ही स्तब्ध झाला आणि निराश होत माघारी परतला. यानंतर संघाने सावरण्याचा प्रयत्न केला. पण काही विकेट्सही गमावल्या.