भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला गेल्या काही वर्षांत खेळ बदलणाऱ्या कामगिरीमुळे ‘सर’ हे टोपणनाव मिळाले. तो काही काळापासून भारतीय संघाच्या सोबत आहे आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये तो पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जडेजाने दावा केला की त्याला ‘सर’ म्हणणे फारसे सोयीचे नव्हते. तो जामनगरचा आहे, जिथे सर्वजण त्याला ‘बापू’ म्हणून संबोधतात आणि त्याला ‘सर’ म्हणण्यापेक्षा ते अधिक पसंत करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सर’ पेक्षा ‘बापू’ म्हणा – रवींद्र जडेजा

सर आणि बापू यापैकी एकाची निवड करण्याबाबत बोलताना रवींद्र जडेजा म्हणतो, “लोकांनी मला माझ्या नावाने हाक मारावी. हे पुरेसे आहे. मला सर म्हणणे आवडत नाही. तुमची इच्छा असेल तर मला बापू म्हणा, मला तेच आवडते. हा सर-वार, मला अजिबात आवडत नाही. खरं तर, जेव्हा लोक मला सर म्हणतात तेव्हा ते सोयीचे वाटत नाही. आम्ही एकमेकांना आदराने संबोधतो. ते नेहमीच ‘आप’ किंवा ‘बापू’ असते.”

हेही वाचा: ICC Apologies:  अवघ्या ६ तासात टीम इंडियाला नंबर-१ वरून हटवले, ICCवर आली जाहीर माफी मागण्याची नामुष्की

ग्राउंड में परफॉर्म करो, बस बात खतम

त्याने त्याच्या वडिलांकडून मिळालेला एक प्रारंभिक सल्ला देखील शेअर केला. त्यांनी त्याला इशारा दिला होता की ‘चमचागिरी’ फार पुढे जात नाही. ग्राउंड में परफॉर्म करो, बस बात खतम (मैदानात परफॉर्म करा आणि बाकी गोष्टी तिथेच संपतात).” यावर तो म्हणतो, “बात खतम मध्ये अशा एखाद्या व्यक्तीचा निर्णायक स्वर होता ज्याने आयुष्यात पुरेसे पाहिले आहे, घसरले आहे, पडले आहे, लिहीले आहे, परत आले आहे, पुन्हा उठले आहे आणि जगण्याची आणि भरभराटीची कोडे सोडवली आहेत.”

रवींद्र जडेजाच्या पुनरागमनाने राहुल द्रविडला प्रभावित केले

रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना ज्या प्रकारे कामगिरी केली त्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूश होते. प्रदीर्घ दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर लगेच बाहेर पडत चांगली कामगिरी करणे कोणासाठीही सोपे नसते. मात्र, जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ७० धावा आणि सात विकेट्ससाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला आणि सर्व विभागांमध्ये तो यजमानांसाठी किती मौल्यवान आहे हे सिद्ध केले.

हेही वाचा: IND vs AUS: मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळे अचानक टीम इंडियाला बदलावे लागले दिल्लीतील हॉटेल, BCCIच्या सूत्रांनी दिली माहिती

दुस-या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, जडेजाच्या पुनरागमनानंतर द्रविड म्हणाला, “यापेक्षा जास्त दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. पहिल्या दिवशी आम्ही त्याची खरी परीक्षा दिली, आम्ही त्याला २२ षटके टाकायला दिली होती, त्यामुळे कोणतीही ढिलाई झाली नाही. त्याला कसोटी सामन्यात उतरवण्याचा काही विचार होता. पण ज्या प्रकारे तो गोलंदाजी करत होता, त्याने उत्तम कामगिरी सुरूच ठेवली. ही त्याची शारीरिकदृष्ट्या मोठी परीक्षा होती. त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्याने खरोखर चांगले आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadeja does not like to be called sir at all people should call him by name or bapu avw