मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य हे कायमच स्वप्नांवर जगणारं असतं. कधी कधी त्याची स्वप्नं पुरी होतात, कधी नाही. पण तो स्वप्न पाहत राहतो. गरज असते ती, त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची. केवळ मध्यमवर्गीय चौकटीत अडकून न राहता, उडी मारू की नको असा विचार करणाºयांचा विचार सोडून द्याा, पण जे उडी मारतात त्यांना संकटं तर अनेक असतातच, पण स्वप्नाची पूर्तता हा त्यांचा जगण्याचा भाग बनतो. मग एक स्वप्न झालं की पुढचं स्वप्न तयारच असतं. कदाचित थोरामोठ्यांच्या स्वप्नापेक्षा ही स्वप्न छोेटी असतील पण ती आपली असतात. मग ही केवळ पडद्याावरची गोष्ट न उरता, तुम्हा-आम्हा सर्वांचीच होऊन जाते. केवळ मध्यमवर्गापुरती न राहता अशी स्वप्नं पाहणाºया सर्वांची होतात. या तुम्हा-आम्हा सर्वांच्या गोष्टीवरच डबल सीट बेतला आहे. संगीत, संवाद, अभिनय, दिग्दर्शन अशा अनेक आघाड्यांवर ही गोष्ट तुम्हाला आपलीशी करणारी आहे. फक्त गोष्ट थोडीशी लांबलेली आहे.
अमित नाईक हा टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात चाळीत वाढलेला. मंजिरी ही कोकणात वाढलेली. गावाकडची मुलगी. लग्नानंतर चांगल्या ऐसपैस घरातून मुंबईतल्या चाळीत थेट दोन खोल्यांमध्ये तिचा संसार सुरू होतो. अर्थात साºया अडचणींना ती हसत सामोरं जाते. मुंबईची क्रेझ, कलाकारांच्या घराचं वेड, टीव्ही मालिकांमध्ये अडकणारी आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणाºया सुखात आनंद सामावलेली अशी अगदी टिपिकल मुलगी. पण त्याच वेळी केवळ घरात कुढणारी नाही, तर स्वप्नांच्या पूर्ततेसाठी वेळप्रसंगी ठामपणे उभी राहणारी. अमित तसा चाळीच्या आयुष्यातच अडकलेला. नशिबाने साथ दिली नाही म्हणून कुढणारा. पण एका क्षणी त्याला जाणवतं की हे असं कुढत जगण्यात काही अर्थ नाही. आपल्या दोघांसाठी घर हवं, आपलं घर. सुरुवातीला घरी विरोध होतो, संकटं तर कायमच उभी ठाकलेली असतात. पण त्यातून स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्याची धडपड सुरूच राहते.
सर्वच कलाकारांनी या गोष्टीत जीव ओतला आहे. अंकुश तर मुंबईचाच आणि चाळीतल्या वातावरणाचा त्याला परिचय आहे. पण मुक्ता बर्वे ही भूमिका जगली आहे. अवखळपणा, लाडिकपणा, नव्याचं अप्रूप, वेळप्रसंगी करारीपणा असं सार काही तिने अगदी आतून साकारलंय. वंदना गुप्ते आणि विद्यााधर जोशी यांनी दमदार साथ दिली आहे.
स्वत:चं घर हा मुळातच आजही सर्वच वर्गांमध्ये कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यांच्याकडे घर आहे त्याला आणखीन मोठं अथवा चांगलं हवं असतं. तर ज्यांच्याकडे नाही त्यांना कसंही करून आपलं स्वत:च घरं हवं असतं. आणि त्यासाठीची धडपड अखंड सुरू असते. मग मुंबई असो की अन्य कोणतं शहर. दिग्दर्शकानं या छोट्याशा कथासूत्रातून जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे. अर्थातच ही कथा मग केवळ मुंबईपुरतीच मर्यादित नाही, कारण या दोघांची स्वप्न पाहण्याची जिगर आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याची धडपड तर सर्वांनाच असते.
निर्माते – रणजीत गुगळे आणि अनिश जोग
दिग्दर्शन – समीर विद्वांस
प्रस्तुती – एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमटेड
कथा-पटकथा : क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस
संवाद – क्षितिज पटवर्धन
छायालेखन – अर्जुन सरोटे
संकलन – चारू श्री रॉय
संगीत – हृषीकेश, सौरभ, जसराज
गीतकार – स्पृहा जोशी, क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस
कलाकार – अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, विद्यााधर जोशी, वंदना गुप्ते, शुभंकर तावडे, संदीप पाठक, आरती वडगबाळकर, पुष्कर श्रोत्री, विकास पाटील