संगमनेर : ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ४५ पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. अनेक वर्षांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी या रस्त्यांमुळे सुटणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
नव्याने मंजूर झालेले रस्ते असे : चंदनापुरी गावांतर्गत आनंदवाडी ते ठाकरवाडी, खांडगाव येथील अरगडे वस्ती ते बालोडे वस्ती, रायतेची अरगडे वस्ती ते रायतेवाडी शिवरस्ता, लोहारेची कदम वस्ती ते मोठेबाबावाडी, नान्नज दुमालाची काशाई मंदिर ते चत्तर वस्ती निमोणचा काशिनाथ मळा ते सातभाई वस्ती, कोंची गावठाण ते धनगर वस्ती, खंडेरायवाडी ते धानोबा रस्ता, शिंदोडीची खामकर वस्ती ते झाप, निमज गाव ते खंडोबामळा, बांबळेवाडी गावठाण ते रामेश्वरदरा, कणसेवाडी गावठाण ते कपालेश्वर, कर्जुले पठार गावठाण ते काटवनवाडी, गुंजाळवाडी गावठाण ते कुरणवाडी, सांगवी गावठाण ते कौठे धांदरफळ, कौठे मलकापूर गावठाण ते चिमणटेक, वरवंडी गावठाण ते पोपळघाट वस्ती, कौठे धांदरफळ गावठाण ते माळ्याचा मळा, धुपेची गिऱ्हे वस्ती ते मामेखेल रोड, झोळे, गुंजाळ मळा खांडगाव ते विरबप्पा रस्ता,
पोखरी हवेलीची गुंजाळ वस्ती ते खैरे वस्ती, हिवरगाव पठारची गोसावी वस्ती ते माऊली रोड, मालदाडचा घळाया ते मोरदरा, मोधळवाडीची घाणेवस्ती ते पिंपळदरा रोड, सुकेवाडीची घुलेवाडी शिव ते उगलेवाडा, मांडवे चहान पट्टा ते सैंदड पाईन रस्ता, कासारेचा चौगुले क्रेशर ते कोल्हे वस्ती, निमगाव भोजापूर चौफुली ते चिकणी शिवरस्ता, जवळे कडलग ते चिखली धांदरफळ शिव रस्ता, साकुर जांबूत रोड ते काळशेत, जाखुरी रोड ते पानोबा वस्ती, दरेवाडीचा जानकर मळा ते मनसुक वस्ती, कोकणगाव शाळा ते इनाम वस्ती, वडगाव पान टोलनाका ते दत्त मंदिर शिव, कुंभारवाडीची ठाकरवाडी ते बिरोबा मंदिर, शिवापूरची डफाळ वस्ती ते अवचितवाडी रोड, बोटाची तळपेवाडी ते महामार्ग, मेंगाळवाडीची तावबा सोमनाथ वस्ती ते लक्ष्मण धावजी, कातोरे वस्ती, तिगावचा कोकणगाव रोड ते कौठे कमळेश्वर, रायतेवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग ते रायतेवाडी गाव, गावठाण ते इनाम धरती खांबे, गणेशवाडी ते गायकवाड वस्ती, तसेच येलखोपवाडी असे एक किमी अंतर असणाऱ्या ४५ शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण आणि खडीकरण केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ४५ शेतपाणंद रस्ते
संगमनेर तालुक्यातील १८५ शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी रोजगार हमीमंत्री भारत गोगावले यांच्याकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४५ शेतपाणंद रस्ते मंजूर केले आहेत. उर्वरित रस्ते लवकरच मंजूर करण्यात येतील. या योजनेमुळे दीर्घकाळचा शेतपाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. महायुती सरकारने ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.