बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चेत असलेले निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यांच्या यादीत संजय लीला भन्साळी यांचे नाव नेहमी आघाडीवर घेतले जाते. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसह चित्रपटांमुळे उत्तम दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्धीझोतात आले. संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान हे एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. तब्बल २१ वर्षानंतर संजय लीला भन्साळी यांनी सलमानबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान या जोडीने ‘खामोशी’पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत अनेक चित्रपट केले आहे. पण ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केलेले नाही. नुकतंच संजय लीला भन्साळी यांनी सलमानसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनीही मनमोकळेपणाने उत्तर दिले.
आणखी वाचा : “आम्हाला एकमेकांचं तोंड…” शिव ठाकरेने सांगितलं वीणा जगतापशी ब्रेकअप करण्यामागचं खरं कारण 

संजय लीला भन्साळी सलमान खानबद्दल काय म्हणाले?

“सलमान माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. मला त्याच्याबरोबर पुन्हा काम करायचे आहे. पद्मावत चित्रपटानंतर मी त्याच्याबरोबर काम करण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण माणूस म्हणून आपण सर्वजण काळाबरोबर बदलत असतो. त्यानुसार सलमानही बदलला आहे आणि त्याच्या मते मीही बदललो आहे.

सलमान खान आणि माझे नाते आजही तितकेच चांगले आहे. आमच्या दोघांमध्ये आजही संभाषण होतं. त्यामुळे आमच्यात संवाद नाही, आम्ही अनोळखी आहोत, असं काहीही नाही. माझ्या मनात सलमानबद्दल फार आदर आहे. खामोशी या चित्रपटात त्याने माझ्यासाठी काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’मध्येही त्याने भूमिका साकारली. सावरियाच्या वेळीही तो माझ्या पाठीशी उभा राहिला.

त्यामुळे आज मी जो काही आहे. त्यात सलमानचा मोठा वाटा आहे. यासाठी मी नेहमीच त्याचा ऋणी राहिन. हो…पण आता चेंडू मात्र त्याच्या कोर्टात आहे. भविष्यात त्याला माझ्याबरोबर काम करायचे की नाही, हे त्याने ठरवायचे आहे”, असे संजय लीला भन्साळी यांनी म्हटले.

आणखी वाचा : “वीणा जगताप हा विषय संपलाय” शिव ठाकरेची आई स्पष्ट शब्दात म्हणाली “तिने लग्नाचा…

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्या दोघात प्रेम आणि द्वेष असे दोन्हीही प्रकारचे संबंध आहेत. हे दोघेही ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटासाठी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र येणार होते. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रद्द करावा लागला. यामुळे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडल्याचे सांगितलं जातं.

विशेष म्हणजे १९९९ मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटामध्ये तो झळकला होता. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केल्याचं पाहायला मिळालं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay leela bhansali opens up on reuniting with salman khan and dispute nrp