छोटय़ा पडद्यावर सध्या विनोदी मालिका आणि त्यातील कलाकारांनी एकच धमाका उडवून दिला आहे. ‘सब’सारखी एक संपूर्ण वाहिनी आज विनोदी मालिकांना वाहिलेली आहे. ‘कलर्स’पासून ‘झी मराठी’पर्यंत सर्वत्र विनोदी कलाकारांचा बोलबाला आहे. नाही, तेच सध्या या वाहिन्यांचे ‘स्टार’ कलाकार आहेत. या दिवाळीत तर ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत घुसलेल्या विनोदवीरांनी धमाका उडवून दिला. ‘सब’च्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या मालिकेतून दिवाळीची विनोदी बहार उडवून दिली आहे. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे या कलाकारांपासून ते कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किू कू शारदा, दीक्षा वखानी असे कित्येक कलाकार घराघरात ओळखले जातात. विनोदी कलाकार आणि मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या या प्रतिसादाबद्दल या कलाकारांनाच नेमकं काय वाटतं आहे आणि या बदलामागची त्यांना जाणवणारी कारणं त्यांच्याच शब्दांत..
चिंता वाढल्या की विनोद जवळचा वाटतो..
विनोदी मालिकांचे प्रमाण वाढण्यामागचे खरे कारण तपासले तर लक्षात येईल की, जेव्हा आपल्या चिंता वाढतात तेव्हाच आपल्याला विनोद जवळचा वाटू लागतो. माणूस जेव्हा चिंतेत असतो तेव्हा एकतर तो गाणी गातो किंवा विनोदांना आपलेसे करतो. आज कित्येकदा आयटी क्षेत्रामधील मुले येऊन आम्हाला सांगतात की, ऑफिसमधील कामामुळे आम्हाला टीव्ही पाहायचा वेळ मिळत नाही. पण, यूटय़ूबवर तुमच्या कार्यक्रमांचे
डॉ. नीलेश साबळे चला हवा येऊ द्या
विनोदी मालिकांना सुगीचे दिवस
आज आपण कितीही म्हटले की विनोदी मालिकांना सुगीचे दिवस आले आहेत, तरी टीआरपीच्या शर्यतीमध्ये
किकू शारदा कॉमेडी नाइट्स विथ कपिल
सास-बहूच्या रडक्या मालिकांना प्रेक्षक कंटाळले आहेत..
लोकांना आज टीव्ही लावल्यावर निखळ मनोरंजन हवे असते. सास-बहूच्या रडक्या मालिका, त्यांचे वादविवाद, हेवेदावे याचा लोकांना उबग आला आहे. त्यामुळे सध्या टक्केवारी पाहिल्यास १०० पैकी ७०
गोपी भल्ला: गोपी ‘एफ.आय.आर.’
हसवणं कठीणच असतं!
पूर्वीपेक्षा आज विनोदी कलाकारांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पालटला आहे, हे नक्कीच खरं आहे. यासाठी कारणही तसंच आहे. लोकांना टीव्ही लावल्यावर आपल्या रोजच्या चिंता आणि काळजी विसरून हलक्याफुलक्या मालिका पाहायला मिळाव्यात अशी इच्छा असते. त्यामुळे नेहमीच्या दैनंदिन मालिकां
दीक्षा वखानी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’
अवघडलेपणा नसतो..
एक कलाकार म्हणून तुम्ही व्यक्त करत असलेली भावना लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवणे हेच तुमचे सर्वात मोठे यश असते. मग ती विनोदी व्यक्तिरेखा असो किंवा गंभीर. हल्ली मनोरंजन म्हणजे विनोदवीर असे समीकरण बनले आहे. विनोदी मालिका ही तुम्ही घरातल्या सगळ्यांबरोबर मिळून पाहू शकता. त्यात मोठे-छोटे असा भेदभाव नसतो. काही विशिष्ट कार्यक्रम वगळता विनोदी मालिकांमध्ये अवघडलेपणा
जितू शिव्हारे (गधाप्रसाद ‘चिडीयाघर’)