Celebrity MasterChef Grand Finale Week: ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर हिंदी टेलिव्हिजनवर दोन कुकिंग शो सुरू झाले. ‘कलर्स टीव्ही’वर ‘लाफ्टर शेफ २’ आणि ‘सोनी टीव्ही’वर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’. या दोन्ही कुकिंग शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘लाफ्टर शेफ २’ शो १ एप्रिलला संपणार होता. पण, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि टीआरपीच्या दृष्टीकोनातून हा शो पुढे वाढवण्यात आला आहे. पण आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ अंतिम टप्प्यात आहे. सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा ग्रँड फिनाले वीक सुरू आहे.
११ लोकप्रिय कलाकारांसह ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या प्रवासाला सुरुवात झाली होती. फराह खान, रणबीर बरार आणि विकास खन्ना यांनी परीक्षणाची धुरा उत्तमरित्या सांभाळली. या प्रवासात ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आयेशा झुलकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. पण, आयेशा जास्त काळ टिकली नाही. आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या अंतिम टप्प्यात एकूण पाच स्पर्धेक येऊन पोहोचले आहेत. निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख या पाच जणांमधील कोण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ जिंकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण, त्याआधी या शोमध्ये झालेल्या खास मैत्रीत भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकताच ‘सोनी लिव्ह इंडिया’च्या इन्स्टाग्रामवर पेजवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्रँड फिनाले वीकमध्ये मुनव्वर फारुकी खास पाहुणा म्हणून उपस्थित राहिल्याचं दिसत आहे. यावेळी मुनव्वर निक्की तांबोळी व तेजस्वी प्रकाशच्या मैत्रीत वादाची ठिणगी पाडतो. प्रोमोमध्ये मुनव्वर निक्कीला तिच्या चाहत्याने पाठवलेलं पत्र वाचून दाखवतो. ज्यामध्ये चाहत्याने निक्कीला तेजस्वी प्रकाशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तेजस्वी निक्कीचा कधीही पत्ता कापू शकते असा चाहत्याने इशारा दिला आहे.
“तेजस्वी प्रकाश नागीण होती आणि तिचा जनसंपर्क (PR) खूप चांगला आहे. त्यामुळे तू तिच्यापासून दूर राहा”, असं निक्कीच्या चाहत्याने पत्रात लिहिलं आहे. त्यावर तेजस्वी म्हणते, “मी पत्ता कापू शकते. पण पीआरच्या जोरावर नाही. तर स्वयंपाक करण्याच्या जोरावर हे करू शकते.” हे ऐकून निक्की म्हणते, “मला सतर्क केल्याबद्दल मी चाहत्याचे आभार मानते. आता मीच अॅडव्हाटेंज जिंकून एखाद्याचा पत्ता कापणार आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या सेमी फिनालेमधून अर्चना गौतम बाहेर झाली. तिचा चीजचेक थोडासा कच्चा राहिल्यामुळे अर्चना गौतम एलिमिनेट झाली. यावेळी भावुक होतं अर्चना म्हणाली होती, “मी या कार्यक्रमात वडिलांसाठी आली होती. तुम्ही आणि या कार्यक्रमाने माझ्या वडिलांचा विचार बदलला. गेल्या २० वर्षांपासून माझे बाबा एका शब्दाला खूप सामोरे जात होते. माझे आजोबा इतके टोमणे मारायचे की, माझा जावई कूक आहे. आता मी बाबांना विचारते, काही समस्या नाही ना? तर बाबा म्हणतात, तू ये. मी तुला चिकन बनवून खायला घालेन.” त्यावर रणवीर बरार म्हणाले होते की, कूकची मुलगी असणं यापेक्षा काही सुंदर गोष्ट नाहीये. गौतमजी तुमची मुलगी हिरा आहे.
© IE Online Media Services (P) Ltd