‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. नवनवे ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’आणि अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारले आहे. मालिकेत सध्या सायलीच्या मंगळागौरीच्या सीक्वेन्सचं शूटिंग सुरु आहे. याच निमित्ताने अमित भानुशालीने मीडियाशी संवाद साधत सेटवरचे काही किस्से सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित भानुशालीला ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मालिकेच्या सेटवर खूप जास्त रिटेक कोणीही घेत नाही कारण, मालिकेतील सगळेच कलाकार दिग्गज आहेत, ते सगळे खूप चांगले आणि जुने कलाकार आहेत. त्यातल्या त्यात मी मराठी मनोरंजनसृष्टीत नवीन आहे. त्यामुळे मीच एक-दोन रिटेक इतरांपेक्षा जास्त घेतो.”

हेही वाचा : “मुंबईकरांसाठी नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं…”, प्रसाद ओकने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अमित भानुशाली पुढे म्हणाला, “मालिकेतील माझे सगळे सहकलाकार खूपच चांगले आहेत. कथेनुसार माझे आणि सायलीचे सगळ्यात जास्त एकत्र सीन्स असतात. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना सांभाळून घेतो. आता अनेक दिवस एकत्र काम केल्यामुळे सगळ्याच सहकलाकारांशी एक छान नातं तयार झालं आहे.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे लवकरच झळकणार हिंदी चित्रपटात, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे नुकतेच २०० एपिसोड्स पूर्ण झाले होते. पहिल्या दिवसापासून या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कित्येक महिने आघाडीवर आहे. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala ter mag fame amit bhanushali reveals which actor take maximum retake on the set sva 00